शुगर मुळे काय त्रास होतो?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:13

मधुमेहामुळे या महत्त्वाच्या अवयवांवर होतो दुष्परिणाम, जाणून घ्या उपाय

Diabetes Symptoms मधुमेहामुळे आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम होतो. आरोग्याला होणारे धोके टाळण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. यासाठी व्यायाम तसंच पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे.
 
मधुमेहामुळे या महत्त्वाच्या अवयवांवर होतो दुष्परिणाम, जाणून घ्या उपाय
मधुमेह किंवा डायबेटिस हा बदललेल्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या विविध आजारांपैकी एक आहे. मधुमेहाच्या विळख्याने आपणा भारतीयांना अक्षरश: गिळंकृत केले आहे. मधुमेहाचे, टाइप १ आणि टाइप २ असे दोन प्रकार आहेत. टाइप-१ या प्रकारात शरीरात इन्सुलीन स्रवत नाही किंवा ते अत्यंत कमी प्रमाणात स्रवते. हे रुग्ण इन्सुलीनच्या इंजेक्शनशिवाय जगू शकत नाही. टाइप-२ या प्रकारात इन्सुलीन कमी प्रमाणात स्रवते, पण या रुग्णांमध्ये गोळ्यांमुळे मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.

मधुमेहाची कारणे :
आई, वडील किंवा कुटुंबातील सदस्यांना मधुमेह असेल तर मुलांना होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेहाची सुरुवात साधारणपणे ४० ते ५० या वयादरम्यान होते. लठ्ठ व्यक्तींना लठ्ठपणाबरोबर ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

​गर्भवती महिलेला मधुमेह असल्यास...
आईला प्रसूतिकाळामध्ये मधुमेह असेल तर त्या बाळाला पण मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. इतकेच नव्हे तर ज्या महिलांना बाळ पोटात असताना मधुमेह असतो, त्यांना साधारणत: दहा-पंधरा वर्षांनंतर मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. जितके पहिल्या प्रसूतीच्या वेळी आईचे वय जास्त, तितकी जेस्टेशनल डायबेटिस म्हणजे प्रसूतिकाळात मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. बदललेली जेवणाची पद्धत, जेवणात फायबर असलेल्या पदार्थांचा अभाव, दारू किंवा धूम्रपानाचे व्यसन, मानसिक व शारीरिक ताणतणाव इत्यादी कारणांमुळे हा आजार होऊ शकते.

​दुष्परिणाम टाळण्यासाठी उपाय
शरीरातील कोलेस्ट्रॉल आटोक्यात ठेवण्यासाठी स्निग्ध पदार्थांचे सेवन कमी करावे. गरज भासल्यास औषधे घ्यावीत. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी सांगितलेल्या तपासण्या कराव्यात. हे सर्व केल्यास एकतर तुम्ही मधुमेह होण्यापासून स्वत:चा बचाव करू शकता किंवा मधुमेह झाल्यास त्याची नीट काळजी घेऊन त्यापासून होणारे वाईट परिणाम टाळू शकता.

​मधुमेहाची लक्षणे
भूक जास्त लागणे, तहान जास्त लागणे, लघवी जास्त लागणे, जखम लवकर बरी न होणे, पायांमध्ये मुंग्या येणे, लघवीमध्ये जळजळ होणे, योनीमार्गाचे इन्फेक्शन होणे, थकवा वाटणे, गोड जास्त खाण्याची इच्छा होणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत. काही वेळा मधुमेह हा ऑपरेशनपूर्वी करावयाच्या शुगर टेस्टमुळे समजतो. मधुमेह शरीरातील एकूण एक अवयवांवर परिणाम करतो. यात प्रामुख्याने किडनी, हृदय, रेटिना, पायातील नसा, पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या या अवयवांवर जास्त परिणाम होतात.

​रक्त शर्करचे प्रमाण किती असावे?
मधुमेहामध्ये सतत वाढलेल्या साखरेच्या प्रमाणामुळे सगळ्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊन त्याचे विकार उद्भवतात. साधारणत: आठ ते दहा तास उपाशीपोटी राहून केली जाणारी शुगर टेस्ट म्हणजे 'फास्टिंग ब्लड शुगर'. ती ब्लड शुगर शंभरपेक्षा कमी हवी. जेवणानंतर दोन तासांनी केलेली ब्लड शुगर १४०पेक्षा कमी हवी. यापेक्षा ब्लड शुगर जास्त असेल तर मधुमेहाची शक्यता जास्त असते.

​प्रतिबंधात्मक उपाय
जास्त गोड खाल्ल्याने मधुमेह होतो अशी लोकांची धारणा असते, तर तसे नाही. मधुमेह झाला तर गोड खाऊ नये हे तत्त्व आहे. सात्विक आहार घ्यावा. भूक नसल्यास खाऊ नये. जेवणातील तळलेल्या पदार्थांचे प्रमाण कमी करावे. नियमितपणे व्यायाम करावा. रोज ३०-४५ मिनिटे चालणे हा एक सहजसोपा व्यायाम आहे. हे करताना नेमकी गती पाळली पाहिजे. जवळपास जाताना पायीच जावे.

​आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
गाडी वापरत असाल तर इच्छितस्थळांच्या अलीकडे गाडी ठेवावी म्हणजे आपोआपच चालणे होते. काही लोकांना जिममध्ये जाऊन व्यायाम करणे आवडत असल्यास तसा करावा. ताणतणावाचे नियोजन करावे. प्राणायाम, मेडिटेशन करण्याने बऱ्याच प्रमाणात तणावाचे नियोजन करता येते. मधुमेह झाल्यास नियमितपणे गोळ्या किंवा इन्सुलिन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे. ब्लड शुगर लेव्हल शक्य तितकी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. रक्तदाब झाल्यास त्याची औषधे नियमिपणे घ्यावीत.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info